पूर्वी दक्षाने बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना न बोलावीता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंञण नसतांनाही गेली. यज्ञात शिवाला अविर्भाव दिला गेला नाही. त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकरजींना हे कळाल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर ञिलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहुन विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ५१ ठिकाणी पडले. हीच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. |